रावण दहन योग्य की अयोग्य???

एखाद्या कथेला कलाटनी देऊन त्याला वास्तविक व जीवंत वाटेल या पद्धतीने लिहिण्याचे काम लेखकाला चांगले जमते, प्रत्येक लेखक लेखणीतून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतो पण ते कितपत सत्य आहे हे वाचकाला ठरवायचे असते. आपण एखाद पुस्तक वाचून किंवा कोणा कडून तरी अपूर्ण ज्ञान घेऊन खरा इतिहास समजल्याचा गैरसमज करुन खोट्या बातमीकडे जास्त भर देता, म्हणून समाजात चुकीच्या प्रथा प्रचलित आहेत. इतर कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचा अपमान करुण फालतूच्या बाता मारण्यापेक्षा विविध पुस्तके वाचून, एकच नाव असलेली अनेक पुस्तके चाळून, विविध व्यक्तीची मते जाणून, पूर्ण पणे माहिती समजून घेतल्या शिवाय खोटं कि खरं याची पडताळणी करून मगच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या (समाजाच्या) संस्कृतीच्या दैवताला दहन करुण त्यांचा अपमान करणे योग्य नव्हे..... हि प्रथा पूर्वाजा पासून चालू असली तरी ती आता थांबायला पाहिजे. तुम्ही रावण दहन करता तर का करता?... या मागचा नेमका हेतू तरी काय?... तुम्हाला यातून ने...